. ....... नात्यांच वास्तव.....
. ....... नात्यांच वास्तव.....
BSF जवान सुरेन्द्र सिंह चे इंडीयन आयडॉल मधील, मै वापस आऊंगा हे गाणं अणि त्याची प्रतिक्रिया ऐकल्यानंतर मी थोडा स्तब्द झालो. गाणं गावून झाल्यानंतर त्याने सांगितले की त्याला सुटी न मिळाल्याने तो बहिणीचे अंत्यदर्शनही घेवू शकला नाही. खरच कस असत सैनिकांच जीवन. कठीण परिस्थितीत , शत्रुंच्या जीवघेण्या हल्ल्यात जगण्याची व जगविण्याची उमेद कायम ठेवत , आनंद उत्साहात जगणं एव्हढ सोप नाहीं. त्यासाठी हवी उच्च दर्जाची मानसिकता आणि निडरपणा जो आमच्या सैनिकांनमधे ठासून भरला आहे.
कठोरपणे कर्तव्य पालन करत असताना, आप्तस्वकीयांच्या, अंत्यविधीलाही ते उपस्थित राहू शकत नाही. स्वताच्या जीवाची शास्वती नसताना, जेंव्हा ते गातात, मै वापस आऊंगा.... मैं वापस आऊंगा... हे ऐकून मन संमिश्र भावनांनी गदगदून येत. या अव्दितीय सकारात्मक मानसिकतेला, ह्रदयापासून सलाम. खरच कल्पणे पलीकडची आहे, यांची सकारात्मक मानसिकता.
गोपालदास पाटील
गोपालदास पाटील
मानसशास्राच्या दृष्टीने पाहिले तर येथे मिळते उर्जा ,हा खरा उर्जेचा स्त्रोत. वरील छायाचित्र त्याचे जिवंत उदाहरण. प्रत्त्येकाच्या चेहऱ्यावर खरे हास्य. येथील प्रत्येक गोष्टीत आपलेपणा ,आलोखी , खरेपणा आणि निरागसता पदोपदी जाणवते.
मानसशास्त्रीय दृष्टीनेकोणातून पाहिले तर, चांगले स्वास्थ व निरागस जीवन, यामुळे मनोविकाराला कोणतेही स्थान नाही. ज्यांना ह्या जीवनाचा आनंद घ्यायला मिळतो, ते खरे भाग्यवान. मग काढाल ना गावाकडे येण्यासाठी वेळ. हमी देतो गावाकडील एका ट्रीपमधे तुम्हाला वर्षाची उर्जा मिळेल.
गोपालदास पाटील
मन चंगा तो कटोरीमें गंगा.खरच ही अगदी सार्थ म्हण आहे.मन समाधानी नसेल तर ऐश्र्वर्यही प्रभावहीन होते.म्हणून आपल्या आयुष्यात आनंद आणि समाधानाला प्रथम स्थान द्द्या.
पण ते समाधान चांगल्या सवयी व कामातून मिळाले पाहिजे.चंचल मनाला योग्य दिशेला वळवून राग ,लोभ आणि अहंकार विरहीत व चार लोकांना , आपल्याला त्यातुन आनंद व समाधान मिळेल ,ते खरे समाधान .
असे समाधान ज्याला मिळवता येत , तो खरा मनोशिल्पकार.कारण स्वताच्या व इतरांच्या भावनां जपणे ज्याला जमते,तो समाजात मनस्वास्थ निर्माण करण्याचं काम करतो.सुदृढ मानसिकतेचे धडे गिरवणारा देखील मानसशास्त्रातील एक स्तंभ म्हणायला हरकत नसावी.
वाढवा प्रेम जिव्हाळा..आपसातील संघर्ष टाळा
दिल्ली मुंबई रेल्वे प्रवासातील ही घटना.
वरवर पाहिलं तर रोजच्या प्रवासात अनेकजण भेटताता पण त्यातील काही ठराविक लक्षात राहतात. मधे एका स्टेशनवर गाडी थांबली असता एक साधु , पांढरी वस्त्रे परिधान केलेला व एक विदेशी महिला डब्यात प्रवेश करतात. तो साधु साधारण वय असेल 24,25 वर्षं.नंतर ती लेडी व त्याच्यात इंग्रजीत संभाषण सुरू झाल.अस्खलीत इंग्रजीत बोलत होता.जिज्ञाशेने मी विचारलं की साधु असूनही इतकं चांगलं इंग्रजी कसे बोलता. उत्तर होते मी 8 वर्ष U S ला होतो व ही एक संगीत टीचर आहे ही मला तेथेच भेटली. थोडयाच वेळात चेकर आला.दोघानी आपापले पासपोर्ट दाखविले.
..जीवन आनंद..
जीवनात सर्वच वाईट असतं असं काही नाही.
दुःखाच्या क्षणी चांगले क्षण आपण आठवत नाही.
चांगल्या क्षणांचा हा सुगंध असा उधळत जावा.
पाहुनी सुगंधी फुलांनाही वाटला पाहिजे हेवा.
रडगाने गाण्यासाठी मित्रांनो हे आयुष्य नसते.
शोधले तर सापडतात अनेक आनंददायी रस्ते.
......... गोपालदास पाटील............